सुटका
लेखन : अभिजीत अशोक इनामदार
दिनांक : १० ऑगस्ट २०१६
शांतामामींचे प्रत्येक कामात असतानाही नेहमीच स्तोत्र पठण चाले. आज शुक्रवार त्यामुळे भल्या पहाटे पासूनच त्यांची दुर्गा कवचाची आवर्तने सुरु होती. अर्थात गोपाळमामांच्या घराला हे काही नवीन नव्हते. शांता मामी म्हणजे सगळ्या गावच्याच मामी. गोल चेहरा, नाकी डोळी नीटस, नऊवारी साडी आणि कपाळावर जुन्या बंद्या रुपया एवढे कुंकू. एकूणच.. एकदम प्रसन्न व्यक्तिमत्व त्यातून बोलण्यात तर खूपच मिठास.
आज सकाळपासून मामी जरा चिंतेतच होत्या कारण दोन दिवसांपासून लागलेला पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नव्हता. घरात दिवस भरलेली... अवघडलेली सुनबाई सीमा. कालच त्या सरकारी दवाखान्यातल्या नर्स बाई येऊन गेल्या आणि म्हणाल्या इथे उपकेंद्रात डिलेव्हरी होण्यासारखी नाही हो. बाळ फिरल्यासारखे वाटते आहे. डांभेवाडीस न्यावे लागेल. तिला तिकडे आणा असे सांगून त्या डांभेवाडीस गेल्या खऱ्या. पण आता जायचे कसे हा एक मोठा प्रश्न होता... कालपासून गावाबाहेरच्या ओढ्यास पाणी खूप वाढले आहे. कोणीही माणूस, गाडी इकडची तिकडे जाऊ शकत नव्हते. त्यात त्यांचा मुलगा काल सकाळी कामावर गेला तो तिकडेच अडकून पडला होता. तो इकडे येऊ शकत नव्हता.
त्यात आज सकाळपासून सीमाच्या पोटात प्रचंड दुखू लागले होते. मामा पण अस्वस्थ होते काय करायचे असा प्रश्न होता. समजा गाडीची व्यवस्था किंवा अजून काही झाले नाही तर शेवटचा उपाय म्हणून मामींनी रखमा सुईणीला शंकर करवी भल्या पहाटेच निरोप धाडला होता. पण दिवस उगवला तरी अजून रखमा कशी आली नाही ह्या विचाराने मामी व्याकुळ झाल्या. सीमाच्या शेजारी बसून मायेने कपाळावरून हात फिरवताना त्यांनी तिला सगळ्या गोष्टींची कल्पना दिली. निदान रखमा मावशींना तरी बोलवा लवकर असे सीमाने म्हणताच त्या पुन्हा बाहेर ओसरीवर आल्या.
मामा अस्वस्थ फेऱ्या मारत होते.
मामी - अहो शंकर नाही आला का हो अजून? रखमेस घेऊन ये म्हणून सांगितले होते त्यास
मामा - अगं तो मघाच आला अन सांगून गेला. तुम्ही आत होता म्हणून हाक मारली नाही. कशी आहे सुंबाईंची प्रकृती?
मामी - अहो तिला कळा सुरु झाल्यात...
मामा - परमेश्वरा...
मामी - काय हो काय झाले? शंकर काय म्हणाला?
मामा - अगं रखमा घरी नाही म्हणाला… घराला कुलूप आहे म्हणे. शेजारी चौकशी केली तरी रात्रीपासूनच घर बंद आहे म्हणे.
मामी - अरे कर्मा... आता हो
मामा - तसा त्याने निरोप ठेवला आहे ती आल्या आल्या इकडे निरोप द्या म्हणून. आता तुम्हीच करा काय करायचे ते. मागल्या खेपेस सुमीच्या वेळेस तुम्हीच नाही केलंत तिचं बाळंतपण?
मामी - अहो त्या गोष्टीस झाली १० वर्षे. आता माझेच हात पाय लटपटतात. भीती वाटते हो.
मामा - हो पण काहीतरी करावे लागेलच ना
मामी - होय खरे... पण तुम्ही आत खोलीच्या बाहेर थांबा काही लागले तर आवाज देता येईल. अन तशी बाकी तयारी मी करून ठेवली आहेच
मामा - ठीक आहे तर मग
असे म्हणून दोघेही आत जायला वळले तोच एक मंजुळ आवाज कानी पडला
- शांता मामीचे घर हेच न्हवं?
मामा मामींनी वळून पाहिले एक स्त्री डोक्यावर खोप घेऊन उभी होती.
मामी - होय ग बाई... मीच शांतामामी? काय हवे होते?
- अहो मला रखमाने पाठवलंय तुमच्या सुनेसाठी...
मामींच्या चेहऱ्यावर अचानक आनंद झाला.
मामी - बरे झाले बाई आलीस वेळेवर. चल पायावर पाणी घे अन ये आत मी सगळी तयारी करून ठेवलीय खास. सुती कपडे, गरम पाणी, नाळ कापायला नवीन ब्लेडचे पान सगळे तयार आहे.
दोघीही भर भर आत निघून गेल्या. मामांना आता जरा धीर आला.
बऱ्याच वेळाने पण... लहानग्या बाळकृष्णाचा रडण्याचा आवाज वाडाभर गुंजला. मामींना काय करू अन काय नाही असे झाले. बाहेर येऊन त्यांनी गोड बातमी मामांना सांगितली, बाळ बाळंतीण सुखरूप आहेत म्हणाल्या अन पुन्हा आत गेल्या. बाळाचे बाळाच्या आईचे सगळे व्यवस्थित करून मग त्या बाई निघाल्या.
मामी - थांब जरा घोटभर चहा घेऊन जा.
- बरं
चहा झाला...
मामी - आगा तूस ओळखले नाही बाई मी
- अहो मी अंबिका न्हवं... माळ्याची. आव रखमा मावशीच्या घराच्या मागल्या बाजूला रहायला हाय न्हवं. मावशी काल रातच्याला गेली न्हवं तकडं डांभेवाडीस... मल्हा सांगून गेलीती. मामीचा सांगावा आला अन म्या नसन तर तू जा बाय म्हून. शंकर तकडं दुसऱ्या घरी निरोप ठिवून गेला.. त्यामुळं वाईच येळच झाला बघा.
मामी - असू दे असू दे पोरी... पण अगदी वेळेवर धावून आलीस बघ.
अंबिका - बर मल्हा अजून लई काम हायती... पुन्यांदा ईन बोलायला.
ती उठली तशी मामी म्हणाल्या अगं थांब तुझी ओटी भरते.
अंबिका - आता रहावं द्या मामी नंतर रिद्धी फिटली की सावकाश पोचती करा... काय गरबड न्हाय.
अन अजून काही बोलायच्या आधीच ती आली तशी निघूनही गेली.
मामींना बरीच कामं होती. आता वेळ नव्हता त्यांच्याकडे. दिवस मावळेपर्यंत पाऊस जरा उघडला. ओढ्याच पाणीही कमी झाल्याची वार्ता आली. काही वेळातच बाळाचे बाबा सुखरूप घरी आले. सगळं आनंदी आनंद झाला. काही वेळातच रखमा आली...
रखमा - मामी... ओ मामी
मामी - आत्ता आलीस होय रखमे. कधीची वाट बघत होते
रखमा - आव काय सांगू मामी वड्याच्या पल्याड दिसभर बसून व्हते न्हवं... कशी यायची व्हते सांगा? पर कशी हाय पोर?
मामी - अगो सकाळीच झाली सुटका तिची. मुलगा झाला.
रखमा - त्वांड ग्वाड करा मामी
मामी - होय बाई बस... अन बर झाल बाई तू अंबिकेला सांगून गेली होतीस ते.
रखमा आश्चर्याने मामींकडे पाहत म्हणाली
रखमा - अंबिका... कोण व अंबिका मला न्हाय ठाव.
मामी - अगं असा काय करतेस तूच नाही सांगून गेली होतीस कि तुला नाही जमले यायला तर तू जा म्हणून
रखमा - आव पर कोण आंबिका म्या न्हाय वळखत
मामी - अशी ग कशी धांदरट तू... स्वतःच विसरलीस
रखमा - आव पर... खरंच. कुठं र्हाती म्हून सांगितलं तिन्ह?
मामी - अगं तुझ्याच घराच्या मागे राहते म्हणाली.
रखमा - काय मामी... म्हाज्या घरा मागं एक तरी घर हाय का?
मामी - अगं हो खरेच की ते माझ्या लक्षात आलेच नाही. तुझ्या घरामागे काहीच नाही. थेट टेकाडावर अंबाबाईचे मंदिर… अधे मध्ये काहीच नाही.
रखमा - व्हय तर ... नाव काय सांगितलं व्हतं?
मामी - अंबिका
रखमा - अंग म्हाझी माय... आन काय वटी बीटी भरली काय?
मामी - अगं मी थांब म्हणाले तर मला म्हणाली "आता रहावं द्या मामी नंतर रिद्धी फिटली की सावकाश पोचती करा... काय गरबड न्हाय".
रखमा - लई नशीबवान बघा मामी तुम्ही अन सुनबाय... आलं का ध्यानात कोण व्हती ती ते...
लेखन : अभिजीत अशोक इनामदार
दिनांक : १० ऑगस्ट २०१६
शांतामामींचे प्रत्येक कामात असतानाही नेहमीच स्तोत्र पठण चाले. आज शुक्रवार त्यामुळे भल्या पहाटे पासूनच त्यांची दुर्गा कवचाची आवर्तने सुरु होती. अर्थात गोपाळमामांच्या घराला हे काही नवीन नव्हते. शांता मामी म्हणजे सगळ्या गावच्याच मामी. गोल चेहरा, नाकी डोळी नीटस, नऊवारी साडी आणि कपाळावर जुन्या बंद्या रुपया एवढे कुंकू. एकूणच.. एकदम प्रसन्न व्यक्तिमत्व त्यातून बोलण्यात तर खूपच मिठास.
आज सकाळपासून मामी जरा चिंतेतच होत्या कारण दोन दिवसांपासून लागलेला पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नव्हता. घरात दिवस भरलेली... अवघडलेली सुनबाई सीमा. कालच त्या सरकारी दवाखान्यातल्या नर्स बाई येऊन गेल्या आणि म्हणाल्या इथे उपकेंद्रात डिलेव्हरी होण्यासारखी नाही हो. बाळ फिरल्यासारखे वाटते आहे. डांभेवाडीस न्यावे लागेल. तिला तिकडे आणा असे सांगून त्या डांभेवाडीस गेल्या खऱ्या. पण आता जायचे कसे हा एक मोठा प्रश्न होता... कालपासून गावाबाहेरच्या ओढ्यास पाणी खूप वाढले आहे. कोणीही माणूस, गाडी इकडची तिकडे जाऊ शकत नव्हते. त्यात त्यांचा मुलगा काल सकाळी कामावर गेला तो तिकडेच अडकून पडला होता. तो इकडे येऊ शकत नव्हता.
त्यात आज सकाळपासून सीमाच्या पोटात प्रचंड दुखू लागले होते. मामा पण अस्वस्थ होते काय करायचे असा प्रश्न होता. समजा गाडीची व्यवस्था किंवा अजून काही झाले नाही तर शेवटचा उपाय म्हणून मामींनी रखमा सुईणीला शंकर करवी भल्या पहाटेच निरोप धाडला होता. पण दिवस उगवला तरी अजून रखमा कशी आली नाही ह्या विचाराने मामी व्याकुळ झाल्या. सीमाच्या शेजारी बसून मायेने कपाळावरून हात फिरवताना त्यांनी तिला सगळ्या गोष्टींची कल्पना दिली. निदान रखमा मावशींना तरी बोलवा लवकर असे सीमाने म्हणताच त्या पुन्हा बाहेर ओसरीवर आल्या.
मामा अस्वस्थ फेऱ्या मारत होते.
मामी - अहो शंकर नाही आला का हो अजून? रखमेस घेऊन ये म्हणून सांगितले होते त्यास
मामा - अगं तो मघाच आला अन सांगून गेला. तुम्ही आत होता म्हणून हाक मारली नाही. कशी आहे सुंबाईंची प्रकृती?
मामी - अहो तिला कळा सुरु झाल्यात...
मामा - परमेश्वरा...
मामी - काय हो काय झाले? शंकर काय म्हणाला?
मामा - अगं रखमा घरी नाही म्हणाला… घराला कुलूप आहे म्हणे. शेजारी चौकशी केली तरी रात्रीपासूनच घर बंद आहे म्हणे.
मामी - अरे कर्मा... आता हो
मामा - तसा त्याने निरोप ठेवला आहे ती आल्या आल्या इकडे निरोप द्या म्हणून. आता तुम्हीच करा काय करायचे ते. मागल्या खेपेस सुमीच्या वेळेस तुम्हीच नाही केलंत तिचं बाळंतपण?
मामी - अहो त्या गोष्टीस झाली १० वर्षे. आता माझेच हात पाय लटपटतात. भीती वाटते हो.
मामा - हो पण काहीतरी करावे लागेलच ना
मामी - होय खरे... पण तुम्ही आत खोलीच्या बाहेर थांबा काही लागले तर आवाज देता येईल. अन तशी बाकी तयारी मी करून ठेवली आहेच
मामा - ठीक आहे तर मग
असे म्हणून दोघेही आत जायला वळले तोच एक मंजुळ आवाज कानी पडला
- शांता मामीचे घर हेच न्हवं?
मामा मामींनी वळून पाहिले एक स्त्री डोक्यावर खोप घेऊन उभी होती.
मामी - होय ग बाई... मीच शांतामामी? काय हवे होते?
- अहो मला रखमाने पाठवलंय तुमच्या सुनेसाठी...
मामींच्या चेहऱ्यावर अचानक आनंद झाला.
मामी - बरे झाले बाई आलीस वेळेवर. चल पायावर पाणी घे अन ये आत मी सगळी तयारी करून ठेवलीय खास. सुती कपडे, गरम पाणी, नाळ कापायला नवीन ब्लेडचे पान सगळे तयार आहे.
दोघीही भर भर आत निघून गेल्या. मामांना आता जरा धीर आला.
बऱ्याच वेळाने पण... लहानग्या बाळकृष्णाचा रडण्याचा आवाज वाडाभर गुंजला. मामींना काय करू अन काय नाही असे झाले. बाहेर येऊन त्यांनी गोड बातमी मामांना सांगितली, बाळ बाळंतीण सुखरूप आहेत म्हणाल्या अन पुन्हा आत गेल्या. बाळाचे बाळाच्या आईचे सगळे व्यवस्थित करून मग त्या बाई निघाल्या.
मामी - थांब जरा घोटभर चहा घेऊन जा.
- बरं
चहा झाला...
मामी - आगा तूस ओळखले नाही बाई मी
- अहो मी अंबिका न्हवं... माळ्याची. आव रखमा मावशीच्या घराच्या मागल्या बाजूला रहायला हाय न्हवं. मावशी काल रातच्याला गेली न्हवं तकडं डांभेवाडीस... मल्हा सांगून गेलीती. मामीचा सांगावा आला अन म्या नसन तर तू जा बाय म्हून. शंकर तकडं दुसऱ्या घरी निरोप ठिवून गेला.. त्यामुळं वाईच येळच झाला बघा.
मामी - असू दे असू दे पोरी... पण अगदी वेळेवर धावून आलीस बघ.
अंबिका - बर मल्हा अजून लई काम हायती... पुन्यांदा ईन बोलायला.
ती उठली तशी मामी म्हणाल्या अगं थांब तुझी ओटी भरते.
अंबिका - आता रहावं द्या मामी नंतर रिद्धी फिटली की सावकाश पोचती करा... काय गरबड न्हाय.
अन अजून काही बोलायच्या आधीच ती आली तशी निघूनही गेली.
मामींना बरीच कामं होती. आता वेळ नव्हता त्यांच्याकडे. दिवस मावळेपर्यंत पाऊस जरा उघडला. ओढ्याच पाणीही कमी झाल्याची वार्ता आली. काही वेळातच बाळाचे बाबा सुखरूप घरी आले. सगळं आनंदी आनंद झाला. काही वेळातच रखमा आली...
रखमा - मामी... ओ मामी
मामी - आत्ता आलीस होय रखमे. कधीची वाट बघत होते
रखमा - आव काय सांगू मामी वड्याच्या पल्याड दिसभर बसून व्हते न्हवं... कशी यायची व्हते सांगा? पर कशी हाय पोर?
मामी - अगो सकाळीच झाली सुटका तिची. मुलगा झाला.
रखमा - त्वांड ग्वाड करा मामी
मामी - होय बाई बस... अन बर झाल बाई तू अंबिकेला सांगून गेली होतीस ते.
रखमा आश्चर्याने मामींकडे पाहत म्हणाली
रखमा - अंबिका... कोण व अंबिका मला न्हाय ठाव.
मामी - अगं असा काय करतेस तूच नाही सांगून गेली होतीस कि तुला नाही जमले यायला तर तू जा म्हणून
रखमा - आव पर कोण आंबिका म्या न्हाय वळखत
मामी - अशी ग कशी धांदरट तू... स्वतःच विसरलीस
रखमा - आव पर... खरंच. कुठं र्हाती म्हून सांगितलं तिन्ह?
मामी - अगं तुझ्याच घराच्या मागे राहते म्हणाली.
रखमा - काय मामी... म्हाज्या घरा मागं एक तरी घर हाय का?
मामी - अगं हो खरेच की ते माझ्या लक्षात आलेच नाही. तुझ्या घरामागे काहीच नाही. थेट टेकाडावर अंबाबाईचे मंदिर… अधे मध्ये काहीच नाही.
रखमा - व्हय तर ... नाव काय सांगितलं व्हतं?
मामी - अंबिका
रखमा - अंग म्हाझी माय... आन काय वटी बीटी भरली काय?
मामी - अगं मी थांब म्हणाले तर मला म्हणाली "आता रहावं द्या मामी नंतर रिद्धी फिटली की सावकाश पोचती करा... काय गरबड न्हाय".
रखमा - लई नशीबवान बघा मामी तुम्ही अन सुनबाय... आलं का ध्यानात कोण व्हती ती ते...
अन चिंब भिजल्या डोळ्यांनी मामींनी दुर्गाकवच म्हणायला सुरुवात केली...
श्रीगणेशाय नमः ||
ओंकाररूप श्रीगणेशातें
गं पहिले अक्षर जयाते
श्रीगजवदान त्या प्रभूतें
नमन माते दुर्गेसीही...||१||
देवी ! दुर्गे ! देई संरक्षण
कवच अंगी तव लेईन
गूढ सर्वसंरक्षक कथीन
अर्थहि नामांचा येथूनि ||२||....
…..
श्रीगणेशाय नमः ||
ओंकाररूप श्रीगणेशातें
गं पहिले अक्षर जयाते
श्रीगजवदान त्या प्रभूतें
नमन माते दुर्गेसीही...||१||
देवी ! दुर्गे ! देई संरक्षण
कवच अंगी तव लेईन
गूढ सर्वसंरक्षक कथीन
अर्थहि नामांचा येथूनि ||२||....
…..
©अभिजित अशोक इनामदार
कामोठे, नवी मुंबई
कामोठे, नवी मुंबई
No comments:
Post a Comment